ज्ञानेश्वर नाडकर्णी

ज्ञानेश्वर नाडकर्णी 



ज्ञानेश्वर नाडकर्णींचे नाव मराठी साहित्यात प्रामुख्याने घेतले जाते, ते त्यांच्या चोखंदळ आणि मार्मिक अशा साहित्य आणि नाट्य, चित्रपट आणि चित्रकला या क्षेत्रांतल्या समीक्षेसाठी.



 ‘मराठी नाटक आणि रंगभूमी’ (१९६३), ‘भारतीय चित्रपट सृष्टीतले नवे प्रवाह’ (१९७४), ‘पिकासो’ (१९८६), ‘हिचकॉक’ (१९९०), ‘अश्वत्थाची सळसळ’ (१९८८), ‘प्रतिभेच्या पाऊलवाटा’ (२००३) अशा पुस्तकांतून त्यांनी भारतीय आणि पाश्‍चात्त्य साहित्य, रंगभूमी, चित्रपट आणि चित्रकला ह्या क्षेत्रांतल्या नामवंतांचा आणि त्यांच्या कलांचा समर्पक परिचय देऊन त्यांच्या कलेची सखोल समीक्षा करून समीक्षा क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. त्याचबरोबर ‘Balgandharva and the Marathi Theater’ आणि  ‘Gaitonde’ ही दोन समीक्षात्मक पुस्तके  इंग्लिशमध्ये लिहिली आहेत.
‘दोन बहिणी’ (१९५६), ‘कोंडी’ (१९५८), ‘चरित्र’ (१९८९), ‘नजरबंद’ (१९९१), ‘वलयांकित’ (१९९६) या त्यांच्या कादंबर्‍या आणि ‘चिद्घोष’ (१९६६), ‘प्रस्थान’ (१९८८) हे काही कथासंग्रह प्रसिद्ध आहेत.   


ला क्षेत्रातील मौलिक समीक्षेबद्दलचा सन्मान म्हणून फ्रेंच सरकारतर्फे ‘कला-साहित्य क्षेत्राचा शिलेदार’ या पुरस्कारासह
अकादमीची शिष्यवृत्ती, मराठी नाट्यपरिषदेचे वि.स.खांडेकर पारितोषिक, ‘चिद्घोष’- (कथा) ललित पारितोषिक, ‘प्रस्थान’- (कथा) केशवराव कोठावळे पारितोषिक, ललितकला अकादमी आणि फिल्म सेन्सार बोर्डाचे सदस्यत्व; असे बरेच सन्मान आणि पुरस्कार लाभले आहेत. 

( संदर - महाराष्ट्र नायक)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.